Monday, February 7, 2011

Sunday, December 26, 2010

आ ह साळुंखे लिखित "शिवराय:संस्कार आणि शिक्षण" ( परमानंदकृत शिवभारताच्या आधारे ) प्रकाशित छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेले परमानंदकृत "शिवभ

आ ह साळुंखे लिखित "शिवराय:संस्कार आणि शिक्षण"
( परमानंदकृत शिवभारताच्या आधारे ) प्रकाशित

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेले परमानंदकृत "शिवभारत" ह्या अस्सल साधनाच्या आधारे शिवरायांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर जिजाऊ आणि शहाजीराजे ह्यांच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा प्रभाव त्यांना छत्रपती पदापर्यंत घेवून गेला.. साळुंखे सरांनी ह्याचा धावता आढावा शिवभारताच्या आधारे घेतला आहे... आ.ह.साळुंखे ह्यांचे हे शिवचरित्रावरील पहिलेच पुस्तक असल्याने चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आणि अपेक्षा आहेत..

Wednesday, December 15, 2010

मालोजीराजे भोसले ह्यांच्या जीवनावर कादंबरी

कोल्हापूर - कथा, कादंबरी, नाटक अशा विविध साहित्य प्रकारातून वाचकाला इतिहासाकडे वळविण्याचे काम महाराष्ट्रातील साहित्यिकांनी मोठ्या प्रमाणावर केले, असे प्रतिपादन राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने आयोजित डॉ. प्रमिला जरग लिखित "आदिपर्व' कादंबरीच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक भगवंतराव मोरे होते.

दरम्यान, डॉ. जरग यांनी इतिहासातील एक उपेक्षित कर्तबगार व्यक्तिमत्त्व कादंबरीच्या माध्यमातून सर्वांसमोर आणले आहे. इतिहासातील अशा अनेक दुर्लक्षित, उपेक्षित व्यक्तिमत्त्वांना साहित्यातून पुढे आणले पाहिजे. असे लेखन प्रकाशित करण्यासाठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुढाकार घेईल, अशी घोषणाही श्री. कर्णिक यांनी केली. डॉ. जरग यांची ही कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजी महाराजांचे वडील मालोजीराजे भोसले यांच्या जीवनावर आणि मराठ्यांच्या इतिहासातील एका दुर्लक्षित कालखंडावर प्रकाश टाकणारी मराठीतील पहिलीच कादंबरी आहे. प्रकाशन क्षेत्रातील प्रसिद्ध मेहता पब्लिशिंग हाऊस संस्थेतर्फे कादंबरी प्रकाशित केली आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ""ऐतिहासिक साहित्यकृतीच्या वाटा इतिहासातून जातात. इतिहास संशोधकांपेक्षाही इतिहासाची खरी कीर्ती साहित्यिकांनी लोकांसमोर मांडली आहे. त्यामुळेच इतिहासाशी समाजाला जोडताना साहित्यिकांची जबाबदारी मोठी असून, इतिहासातील सत्याशी त्यांनी प्रामाणिक असले पाहिजे.''

प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, ""इतिहासाशी प्रामाणिक राहून केलेले आणि नैतिकतेचा सांभाळलेला तोल ही या कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत. मराठ्यांच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण कालखंडाचा संदर्भ ग्रंथ म्हणून ही कादंबरी निश्‍चितच उपयुक्त आहे.''

लेखिका डॉ. जरग म्हणाल्या, ""आई कमलाबाई मोरे यांना जिजाऊंवर लेखन करायचे होते. त्यासाठी त्यांनी चौफेर अभ्यास सुरू केला होता; मात्र त्यांचे हे काम अपूर्ण राहिले. ते पूर्ण करण्यासाठी माझा अभ्यास सुरू झाला आणि या अभ्यासात मालोजीराजे यांच्यावर कादंबरी लिहावी, असा विचार पुढे आला.''
कार्यक्रमात राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुरस्कार मिळाल्याबद्दल धम्मपाल रत्नाकर, सुचिता पडळकर यांचा सत्कार झाला. मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक अनिल मेहता, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांची भाषणे झाली. भीमराव धुळुबुळू यांनी सूत्रसंचालन केले.

शहाजी राजे यांची गढी (नुतनीकरणानंतरचा देखणा परिसर)


shahajiraje birth anniversary at ellora,verul

शहाजी राजे यांची गढी (नुतनीकरणानंतरचा देखणा परिसर)

thanks..छायाचित्र - चंद्रकांत थोटे esakal

Thursday, October 28, 2010

Shahajiraje With Jijau And Shivaji Maharaj



Swarajya Sankalpak Shahajiraje Malojiraje Bhosale.....

भातोडीच्या लढाईची आठवण जपायला हवी..



शहाजीराजांचा आज स्मृतिदिन

नगर, २3 जानेवारी

भातोडीच्या लढाईत मुघल आणि आदिलशाही फौजांची धूळधाण उडवणारे ‘स्वराज्य संकल्पक’ शहाजीराजे यांचे भव्य स्मारक उभारण्याचं काम वेरूळला सुरू आहे. नगरमध्ये मात्र एका अर्धपुतळ्याव्यतिरिक्त या महान राजाची आठवण जागवणारं काहीही स्मारक नाही.
निजामशाहीच्या सरत्या काळात अनेक मराठे सरदारांचा उदय झाला. त्यांच्या पराक्रमाने अवघा महाराष्ट्र झळाळून निघाला. शहाजीराजांची समशेर सन १६२४ मध्ये नगरपासून १८ किलोमीटर अंतरावर झालेल्या भातोडीच्या लढाईत तळपली. मुघलसम्राट जहांगीराचा सेनापती लष्करखानाचे १ लाख २० हजार आणि विजापूरच्या आदिलशाहाचे ८० हजार अशा एकूण २ लाखाच्या फौजेला त्यांनी केवळ रोखलेच नाही, तर पळता भुई थोडी केली. शहाजीराजांच्या या पराक्रमाची आठवण करून देणारे भव्य स्मारक नगरमध्ये उभारावे, अशी मागणी अनेक ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी १९७८ मध्ये केली होती. त्यानुसार तेव्हाचे महसूलमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या उपस्थितीत राजे शहाजी प्रतिष्ठानची स्थापना नगरमध्ये करण्यात आली. शहाजीराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा आणि त्यांचे चरित्र प्रकाशित करण्याचा संकल्प त्या वेळी करण्यात आला. भातोडीच्या लढाईचे स्मारक, तसेच समाधीचा जीर्णोद्धार करण्याचेही ठरले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९७९ मध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या आवारात शहाजीराजे व राजमाता जिजाऊंचा अर्धपुतळा बसवण्यात आला. व्याख्यानमाला घेऊन स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं, पण भातोडीच्या स्मारकाचं स्वप्न मात्र साकार होऊ शकलं नाही.
ज्या भातोडीत मेहेकरी नदीकाठी शहाजीराजे व त्यांचे धाकटे बंधू शरिफजी यांनी मोठा पराक्रम गाजवला तेथील महाल आता शेवटच्या घटका मोजत आहेत. गनिमी कावा वापरून शहाजीराजांनी भातोडीच्या तुडुंब भरलेल्या तलावाचा भराव सुरूंग लावून फोडला. पाण्याच्या लोंढय़ात शत्रूचं लाखावर सैन्य वाहून गेलं. उरल्या-सुरल्या सैन्याला पळती भुई थोडी झाली. दोन सुलतानी महासत्तांचा कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी सैन्यानिशी पराभव करणारी ही लढाई त्रिखंडात गाजली. शहाजीराजांच्या ठायी असलेली धडाडी, बुद्धिमत्ता आणि युद्धकौशल्याचा प्रत्यय यानिमित्ताने सर्वाना आला. याच लढाईतील व्यूहनितीचा उपयोग पुढे शिवाजीराजांना अनेक लढाया जिंकण्यासाठी झाला.
भातोडीत लष्कराचे मोठे केंद्र होते. जिथे हत्ती, घोडय़ांना आणि सैनिकांना प्रशिक्षण दिले जात असे, तो परिसर आता पार उजाड झाला आहे. कलावंतीणीचा महाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूंतील सागवानी खांब, तुळया, दगड लांबवले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या भिंती ढासळत आहेत. हा परिसर नगर आणि बीड जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवर येत असल्याने त्याची देखभाल कोणी करायची हा प्रश्न आहे. निदान एखादा स्मृतिफलक तिथे उभारला, तर या स्थानाचं महत्व लक्षात येऊन त्याची जपवणूक होऊ शकेल.
नगर शहरात सध्या नगर अर्बन बँकेचे मुख्य कार्यालय आहे, त्याच्या शेजारी भोसले घराण्यानं बांधलेलं अमृतेश्वराचं मंदिर आहे. पूर्वी याच परिसरात त्यांचा सरकारवाडा आणि घोडय़ाची पागा होती. शहाजीराजांनी निजामशाहच्या वारसाला मांडीवर बसवून काही वर्षे राज्यकारभारही पाहिला. काही काळ त्यांचं वास्तव्य नगरच्या भुईकोट किल्ल्यातील राजमहालात होतं. वडिलांच्या विरोधात बंड करून नगरला आलेला युवराज शहाजहान शहाजीराजांच्या
आश्रयाला आला तेव्हा त्यांची भेट इथेच झाली होती.
शहाजीराजांचं मूळ गाव असलेल्या वेरूळ येथील गढीच्या परिसरात मालोजी व शहाजीराजांचं भव्य स्मारक उभारलं जात आहे. शहाजीराजांचा देखणा पुतळा तिथे उभारण्यात आला आहे. असंच स्मारक नगर आणि भातोडीला उभं राहायला हवं. तसा संकल्प त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या (२३ जानेवारी) पुन्हा करायला हवा..

Friday, May 30, 2008

shahaji raje

स्वराज्य-संकल्पक शाहजीराजे भोसले


शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत शाहजी राजांचा काडी इतकाही संबंध नव्हता हा बरयाच इतिहास कारांचा आवडता सिद्धांत आहे.
परंतु नरहर कुरुंदकर यांच्या मते,
"शाहजी कर्नाटकात एक स्वतंत्र्य राज्य जन्माला घालीत होता.इकडे महाराष्ट्रातही राज्य जन्माला घालीत होता,तो स्वतःला राजा म्हनवीत होता,दरबार भरवीत होता,समकालीन विजापुर दरबाराने हे ओळखून १६४८ साली शाहजी गिरफ्तार केला,इकडे विजापुरकरांचा पराभव शिवाजीने केला,याचे गोडवे आपण गातो.तिकडे संभाजीनेही विजापुरकरांचा कड़वा प्रतिकार करून पराभव केला हे आपण विसरतो, दोन्हीकडील तयारया,शिस्त शाहजीच्या आहेत,बंगलूरला संभाजी आणि पुण्याला शिवाजी यांच्या सर्व वागणूकीमध्ये योज्नाबद्ध्ता आणि एकसारखेपणा दिसतो,त्याचे कारन मागे शाह्जींची पार्श्वभूमी व त्यांच्या तालमीत तयार झालेले सरदार,कारभारी हे आहेत.पुणे जहागिरीत शिवाजीच्या निर्णयाच्या विरुद्ध शाहजीकड़े अपील करण्याची पद्धत होती,शिवाजीचा हुकुम कोणताही असो,अंमल अमुक प्रकार द्यावा,असा निर्णय जिजाबाई देई,तोच पाळला जाई,हां प्रकार १६५३ पर्यंत दिसतो,व शाह्जीने दिलेला शेवटचा हुकुम १६५५च आहे,१६५५ पर्यंत बहुतेक महत्वाच्या प्रकरणी शाह्जींचा निर्णय अंतीम मानला जाई ह्या अनुमानास पुरावा आहे,शाहजीविरुद्ध विजापुरकरांकडे दाद मागण्याची प्रथा पुणे जहागिरीत नव्हती,या अनुमानालाही आधार आहे,१६५५ नंतर मुलकी कारभारात तर जिजाबाईच १६७४ पर्यंत महत्वपूर्ण काम करत होती.शाह्जीस बाजी घोरपडे याने दगा देवून कैद केले,हा दंश जिजाबाई शेवटपर्यंत विसरली नाही,घोरपड़ेंचा सूड घ्यावा,हा तिचा मनोदय तिने पत्राद्वारे शिवाजीला कळविला आहे,जिजाबईला शाह्जीचा अपमान किती झोंबत होता,याचा हा पुरावा जिजाबाईचे मन समजून घेताना महत्वाचा आहे,

इतिहासतज्ञ वा.सी.बेद्रे यांच्या मते शाहजीराजांच्या आदेशानुसार शिवाजीने हिंदवी स्वराज्य स्थापनेची सुरवात केली.

सेतु माधवराव पगडी शाहजीराजांकडून शिवरायांना स्वराज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली या गोष्टीला आधार नसल्याचे म्हणतात,पण त्याच बरोबर शाहजी राजांनी मोगलांशी दिलेल्या एकहाती झुंजिचा परिणाम शिवाजी महाराजांवर झाल्याचे नमूद करतात,

सप्टेबर १६३३ मध्ये त्यांनी मुर्तुजा नावाच्या दहा वर्षाच्या मुलाला निजामशाहीच्या गादीवर बसवून संपूर्ण राज्य कारभाराची सूत्र स्वतःच्या हाती घेतली होती व नोव्हेबर १६३६ पर्यंत ते स्वतंत्र्य राज्यकारभार पाहत होते,शाहजीराजे बंगलोरला स्वतंत्र्य दरबार भरवित असत,त्यांच्या पदरी अनेक विषयातील विद्वान असल्याचे जयराम पिंडे याने सांगितले आहे